श्री शिवराज्याभिषेकची सांगता “स्वच्छ रायगड.. सुंदर रायगड… मोहीमेने “
रायगड (प्रतिनिधी ) : किल्ले रायगडावरती छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ३५१ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिव राज्याभिषेक पाड पडल्या नंतर दुपारी किल्ल्यावरील तसेच किल्लाखाली उतरताना रस्त्यातील रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक कागद असा जवळपास २५ गॅरबेज बॅग भरून कचरा उचलून तो संस्थेच्या दुर्ग सैनिकांनी गडाखाली आणून ठेवला. गड किल्ले संवर्धन संस्थेच्या वतीने गेले ५ वर्ष झाली हा उपक्रम राबवण्यात येतो. या मोहीम मध्ये संस्थेचे २२ दुर्ग सैनिक व दुर्गसेविका सहभागी झाले होते.
सदर मोहीम गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने आयोजीत केली होती.