पुणेकरांनो पाणी जपून वापरा ! शहरात 2 दिवस पाणीपुरवठा बंद; पाहा तुमच्या भागातील वेळापत्रक
पुणे शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रावेत उपसा केंद्रातून पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी बाजूला हटविण्याचे तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे.
हे काम बुधवारी, 21 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याने त्या दिवशी संबंधित जलवाहिनीवरील पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, शहरातील काही भागांमध्ये संपूर्ण दिवस पाणीपुरवठा खंडित राहणार असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर होणार आहे. तसेच गुरुवारी, 22 जानेवारी रोजी पाणीपुरवठा उशिरा सुरू होईल आणि तो कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.रावेत उपसा केंद्र येथील मुख्य जलवाहिनी बाजूला हलविण्याचे नियोजित काम करण्यात येणार आहे. हे काम तांत्रिक स्वरूपाचे असून, जलवाहिनीवरील दाब पूर्णपणे बंद करूनच ते करावे लागणार आहे. त्यामुळे बुधवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हे काम रावेत उपसा केंद्र परिसरात करण्यात येणार आहे. हे केंद्र पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याची एक अत्यंत महत्त्वाची यंत्रणा असून, येथून मोठ्या प्रमाणावर शहराच्या विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो.Akshay Kumar : धक्कादायक! अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघातबुधवार, 21 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. गुरुवार, 22 जानेवारी रोजी पाणीपुरवठा उशिरा सुरू होईल आणि कमी दाबाने मिळण्याची शक्यता आहे.या कामाचा फटका कळस, माळवाडी, जाधव वस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडीचा काही भाग, म्हस्के वस्ती, संजय पार्क, बर्माशेल परिसर, विमानतळ आणि आसपासच्या भागांतील नागरिकांना बसणार आहे. या परिसरातील घरगुती नागरिकांसह व्यावसायिक आस्थापनांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जलवाहिनी बाजूला हटविण्याचे काम हे नियोजित विकासकामाचा भाग आहे. भविष्यात पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, तसेच पाणीपुरवठा अधिक सुरक्षित आणि दीर्घकालीन स्वरूपात सुरळीत राहावा, यासाठी हे काम आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.Mumbai Metro : मुंबई मेट्रोची मोठी चाल! 5 महत्त्वाच्या स्थानकांवर बससेवा सुरू; केवळ 9 रुपयांत पोहोचा कार्यालयातबुधवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे नागरिकांना पाण्याची अडचण जाणवू शकते. गुरुवारी पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने मिळाल्याने सकाळच्या वेळेत पाण्याचा ताण जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आगाऊ सूचना देत पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या नियोजित कामाबाबत नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर काम करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






