Home » शिक्षा » इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमासाठी नवीन आराखड्याचा मसुदा तयार

इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमासाठी नवीन आराखड्याचा मसुदा तयार

Facebook
Twitter
WhatsApp
154 Views

इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमासाठी नवीन आराखड्याचा मसुदा तयार

सार्वभौम न्युज समूह

प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमासाठी नवीन आराखड्याचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यांच्यासाठी www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्व संबंधितांना त्याचा आढावा घेता येईल.

अभ्यासक्रमात नेमके काय बदल?

इयत्ता ३री ते ५वीसाठी:

पारंपरिक ‘परिसर अभ्यास’ या विषयाऐवजी आता ‘आपल्या सभोवतालचे जग’ हा विषय शिकवला जाणार.

भाग एक मध्ये विज्ञान आणि भूगोल तर भाग दोन मध्ये इतिहास व नागरिकशास्त्र यांचा समावेश.

इयत्ता ४ थीसाठी:

‘शिवछत्रपती’ हे सध्याचे पाठ्यपुस्तक कायम ठेवण्यात आले आहे.

इयत्ता ६वी पासून:

इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हे विषय स्वतंत्रपणे शिकवले जातील.

इयत्ता ९वीपासून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय स्वतंत्रपणे अभ्यासक्रमात समाविष्ट होतील.

इयत्ता ११वी व १२वीसाठी:

अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) च्या आधारावर निश्चित केला जाईल.

कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य

इयत्ता ६वीपासून व्यावसायिक शिक्षण सुरू होणार असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाईल. यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:

 

या बदलांचा उद्देश

विद्यार्थ्यांमध्ये विषयांची सखोल समज निर्माण करणे

शालेय शिक्षण अधिक व्यवहाराधारित, समग्र, आणि कौशल्यकेंद्रित बनवणे

शिक्षण प्रणालीला आधुनिक गरजांशी सुसंगत बनवणे

सर्वांसाठी खुला मसुदा

हा अभ्यासक्रम मसुदा सर्वांना उपलब्ध करून दिला असून, संबंधितांनी www.maa.ac.in या संकेतस्थळावर जाऊन तो पाहावा आणि आपले अभिप्राय नोंदवावेत. हे अभिप्राय पुढील अंतिम आराखड्याच्या तयार करण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!