Home » देश आणि परदेशात » साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी – यमराज खरात

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी – यमराज खरात

Facebook
Twitter
WhatsApp
171 Views

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी – यमराज खरात

सार्वभौम न्युज समूह

पुणेः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंचच्या वतीने भव्य संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, ही आग्रही मागणी करण्यात येणार आहे. गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ यावेळी होणाऱ्या या कार्यक्रमाला संत बौद्धिक मंचाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी स्वदेशानंद ब्रह्मगिरी महाराज अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी चाणक्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यमराज खरात हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
या संमेलनात भारताला हिंदू राष्ट्र आणि घोषित करावे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिले जावे, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला जावा, या मागण्या प्रामुख्याने मांडल्या जाणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभतळागाळातील लोकांना मिळावा यासाठी करण्याच्या उपक्रम आणि उपाययोजना, याबाबत सखोल विचार करण्यात येईल.
भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे, यासाठी आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंच या दोन्ही संस्थांकडून व्यापक स्वरूपात कार्य करीत आहेत. विशेषतः भारतीय तत्त्वज्ञान जगाला मार्गदर्शक असल्याची या संस्थांची धारणा असून भारतीय तत्त्वज्ञान जगभरात पोहोचविण्यासाठी या संस्था सातत्याने काम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!