Home » निवडणूक » प्रारूप प्रभाग रचनेवर शेकडो नागरिकांनी आक्षेप घेतल्याने सभागृहाच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक

प्रारूप  प्रभाग रचनेवर शेकडो नागरिकांनी आक्षेप घेतल्याने सभागृहाच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक

Facebook
Twitter
WhatsApp
146 Views

प्रारूप  प्रभाग रचनेवर शेकडो नागरिकांनी आक्षेप घेतल्याने सभागृहाच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक

सावभौम न्युज समूह

 

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होऊन आता १५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र प्रभाग पुनर्रचनेच्या मसुद्यावरून पुण्यातील राजकारण आता चांगलेच तापले आहे.

स्थानिक नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षावर निवडक नेत्यांना फायदा पोहोचवण्यासाठी आरक्षणात फेरफार केल्याचा आरोप केला आहे. अनुसूचित (एससी) जातीचे प्रतिनिधित्व कमी करण्यासाठी नवीन प्रस्तावित सीमा आखण्यात आल्याचा दावा निदर्शकांनी केला. तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली.

          मसुदा आरखड्याची सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडली. यादरम्यान ‘शिवाजी महाराजांचा विजय असो’ आणि ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. राज्य प्रशासनातील अधिकृत अधिकारी व्ही. राधा यांनी पीएमसी आयुक्त नवल किशोर राम आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या सुनावणी दरम्यान अध्यक्षस्थान भूषवले.

प्रारूप प्रभाग रचनेवर शेकडो नागरिकांनी आक्षेप घेतल्याने सभागृहाच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. पुण्यात एकूण ५,९२२ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत, त्यापैकी २,९२० हरकती गुरुवारी झालेल्या पहिल्या २९ वॉर्डशी संबंधित होत्या. वॉर्ड २४ (कमला नेहरू रुग्णालय-रास्ता पेठ) मध्ये सर्वाधिक नागरिकांची उपस्थिती होती. या वॉर्डमध्ये एकूण ८५ नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!