गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, गाडी चालकाच्या रक्ताची तपासणी होणार; गुन्हे शाखेकडं तपास वर्ग
नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार अपघातामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालकगंभीर जखमी झाला.
(Gautami Patil) या प्रकरणी चालकाने अमली पदार्थांचे सेवन केलं होतं का, याचा तपास केला जाणार आहे. चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला आहे.
अपघातानंतर जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी केली आहे. ठाकरे शिवसेनेने गौतमी पाटीलला अटक करण्याच्या मागणीसाठी सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं. रिक्षाचालकाच्या मुलीने वडिलांच्या उपचाराचा खर्च आरोपीने करावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे. सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील आणि अपघातानंतर क्रेन कोणी बोलावली याचाही तपास केला जाणार आहे.


या अपघातानंतर गौतमी पाटील किंवा तिच्या टीमने कोणतीही दखल घेतली नाही. तसेच रिक्षाचालकाकडून देखील आरोप करण्यात आला आहे की, पोलीस देखील या प्रकरणी सहकार्य करत नाहीत. दरम्यान ही कार स्वतः गौतमी पाटीलच्या नावावर आहे. त्यामुळे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोशींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गौतमी पाटीलवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रकरण काय?
पुण्यातील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबरला एका हॉटेल समोर होती. यामध्ये चालकासह दोन प्रवासी होते. त्यावेळी या रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारने जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
गौतमी पाटीलला अटक होणार? पुण्यातील अपघात प्रकरणी थेट चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन
autami Patil Pune Accident Chandrakant Patil Call to DCP : कायम प्रसिद्धीच्या झोतात असणारी नृत्यांगना तसेच अभिनेत्री गौतमी पाटील हिला पुण्यातील एका अपघात प्रकरणी थेट अटक होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी गौतमीला नोटीस बजावली आहे. तसेच कोथरूड चे आमदार असलेले चंद्रकांत पाटील यांनी देखील या प्रकरणी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र हे प्रकरणं नेमकं काय जाणून घेऊ…
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबरला एका हॉटेल समोर होती. यामध्ये चालकासह दोन प्रवासी होते. त्यावेळी या रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारने जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
मात्र या अपघातानंतर गौतमी पाटील किंवा तिच्या टीमने कोणतीही दखल घेतली नाही. तसेच रिक्षाचालकाकडून देखील आरोप करण्यात आला आहे की, पोलीस देखील या प्रकरणी सहकार्य करत नाहीत. दरम्यान ही कार स्वतः गौतमी पाटीलच्या नावावर आहे. त्यामुळे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोशींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गौतमी पाटीलवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. यासाठी ठिय्या आंदोलन केले. कारण पोलिसांनी गौतमीला चौकशीसाठी 30 सप्टेंबरला बोलावल्याची माहिती होती. पण ती चौकशीसाठी न येता शो करत महाराष्ट्रामध्ये फिरत होती. त्यामुळे गौतमीला अटक व्हावी अशी मागणी केली जात आहे.






